राज्यात आजपासून LOCKDOWN लागू...पहा LOCKDOWN सविस्तर नियमावली..
कोविड-19 चा प्रसार थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही निर्बंध आणि मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. जे १ मे २०२१ च्या सकाळी सात वाजेपर्यंत अंमलात राहतील.
परंतु, महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता सदर निर्बंधांमध्ये काही फेरबद्दल केले आहेत. हे बदल २२ एप्रिल संध्याकाळी ८ वाजेपासून १ मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत राहतील. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व शासकीय कर्मचाऱ्यांनाच रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.
अशी आहे नवीन नियमावली (यावेळेत फक्त ही दुकाने सुरू राहणार आहेत):
१) किराणा दुकाने- सकाळी ७ ते ११
२) दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विक्री- सकाळी ७ ते ११
३) भाजीपाला विक्री- सकाळी ७ ते ११
४) फळे विक्री- सकाळी ७ ते ११
५)अंडी,मटण, चिकन,मासे विक्री- सकाळी ७ ते ११
६) कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने- सकाळी ७ ते ११
७) पशूखाद्य विक्री- सकाळी ७ ते ११
८)बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने- सकाळी ७ ते ११
९)पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने- सकाळी ७ ते ११
१०)येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने- सकाळी ७ ते ११
११) लग्न समारंभात नियंमांचं उल्लंघन केल्यास ५० हजार दंड
१२) लग्नात फक्त २५ लोकांना परवानगी.
(एकाच हॉलमध्ये २ तास कार्यक्रम)
१३) आंतरजिल्हा प्रवास फक्त महत्त्वाच्या कारणांसाठी
१४) मुंबईत खासगी गाडीत प्रवास ५० टक्के क्षमतेनं
१५) सरकारी कार्यालय १५ टक्के क्षमतेनं
१६) खासगी बसेस ५० टक्के क्षमतेनं

No comments:
Post a Comment